शंभू चरित्रं भाग ३९

                                                                       शंभू चरित्रं भाग ३९


                               पण! आता सजेचा दुसरा अंमल चालू झाला होता. सजा होती "जबान काटायची". हाबशी आले लखंलखंती नंगी तलवारं घेऊन. पण! संभाजींच तोंड बंद जीभं छाटणारं कशी?...मग! हाप्शी पुढे आले जबडा उघडायची कोशिश करू लागले...पण! जबडा उघडेना......मग! दोघांनी कानावरं दाबूजोरं दिला...प्रचंsssड दाब दिला...प्रचंsssड दाब पण! उघडेना जबडा, मग! एकानी मस्तकावरं प्रहारं केला,,,पण! जबडा उघडेना......
अरे! उघडेल कसा...वाघाचा जबडा आहे,,,,,,"वाघाच्या जबड्यात...घालूनी हात...मोजती दात...हि आमची औकात,,, सांगणारा संभाजीये"
पण! तोपर्यंत एकानं युक्ती केली, संभाजींच नाक दाबून धरलं...श्वासासाठी जीव गलबलंला,,,तळमळंला,,,श्वासासाठी ओठं हलले,,,जीभं लवलवंली आणि त्या संधीचा घेतला फायदा......सांडशी घुसली आत,,,सांडशीत पकडली जीभं,,,ओढली बाहेरं,,,नंगी तलवारं लखंलखंली सप्प्प्प्प्प्प्प्प्प्प..............
तोंडातनं ओघळलं नुसतं लालबुंद रक्तं......जीभं पडली होती समोरचं वळंवळंत,,,ती सुद्धा तयारं न्हवती संभाजी राजांपासनं पोरकं व्हायचं......अरे! ज्या जीभेनं उमटंवले..."जगदंब - जगदंब" चे बोल,,,ज्या जीभेनं दिली किल्कारी..."हर हर महादेव"ची,,,ज्या जीभेनं केला जागरं,,,"जय भवानी"चा,,,जी जीभं म्हणत राहिली..."आऊसाहेब"...
"माँसाहेब"..."आबासाहेब"...ती जीभं पडली होती समोरंच वळंवळंत............
एक नाही,,,दोन नाही तब्बलं चाळीस दिवस अनन्वीत अत्याचारं चालला होता...............
अरे! बोकडं सोलावं असं संभाजींच कातडं सोलून काढलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं......चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र......यातनांचा जाळं...जाळं झाला नुसता. कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं,,,कुणीतरी यायचं हाताची बोटं छाटायचं,,,कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचं...कुत्र्या, गिधाडांना खाऊ घालायचं......
अरे! कुणी बघितलं असतं तरं वाटलं नसतं..."मराठ्यांचा छत्रपती" आहे......अरे! भुतासारखी अवस्था झालेली. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आपला ""सर्जा"" सोसत राहिला,,,सहन करत राहिला...का???...आपण "शिवछत्रपतींचे पुत्रं" आहोत या "अस्मितेसाठी",,,"स्वराज्यासाठी",,,"राष्ट्रधर्मासाठी"......सहन करत राहिला चाळीस दिवस.

No comments: