राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते.
महाराणी सोयराबाई ह्या त्यांच्या मातोश्री, तर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे मामा.
त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी
किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या
अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या
विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड
त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे
व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. फाल्गुन
कृष्ण ९ शके १६२१ म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये पुण्याजवळील
सिंहगड येथे
त्यांचा मृत्यू झाला.
राजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल खऱ्या अर्थाने संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्माण झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपुर, कोल्हापुर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर , उज्जैन व इंदोर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. ती निर्माण का झाली, त्या पाठीमागे पार्श्वभुमी काय हे पाहण्यासाठी आपल्याला राजारामा महाराजांच्या काळात जावे लागते कारण त्याचा उगम तिथे आहे. नंतर शाहु व प्रामुख्याने बाळाजी विश्वनाथ व बाजीराव यांनी त्यात फेररचना करुन मराठा मंडळ आणले .
छत्रपती संभाजी नंतरच्या मराठा राज्याची वाटचाल पाहाणार आहोत. थोरल्या
राजांनी जे कामावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली ते त्यांनी राखले
पण त्यांचा धरपकडी व नंतर हत्ये मुळे मराठेशाहीचा पार कणा मोडून गेला. स्वराज्यास
छत्रपती हवा, राजगादी रिकामी राहता कामा नये, शिवरायांनी जे चिंतिले होते ते वाया
जाऊ नये म्हणून राजारामाला मंचकावर बसविले. हा कालावधी या छोट्या हिंदु राज्याला
फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला.
छत्रपती राजाराम व नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्य पाहीले व तो
काळ गाजविला व राज्य (थोडेसे का होइना जिंवत ठेवले) त्या कालावधीस
आपण थोडक्यात भेट देऊ. छत्रपती राजाराम हा सन १६७० च्या २४ फेब्रुवारीला जन्मला.
जन्मताना तो पायाकडुन जन्मला म्हणुन सर्वजन चिंतीत झाले असता शिवाजी महाराजांनी हा
पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तवीले. (ही कथा) जरी राजारामाने पातशीही पालथी
घातली नाही तरी त्याने पातशाहाला मात्र झुंजवत ठेवुन यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजारामराजेंना लिहीता वाचता येत होते. राजाराम हा शांत
धीरगंभीर प्रकृतीचा होता. राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव
मोहीत्यांकडे ( स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हंबीरराव हे
कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी
प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामराजेंच लग्न लावले.
१६८९
रोजी संभाजी महाराजांना पकडले. गादीचा औरस वारस शाहु त्यावेळी ७ वर्षाचा पण
न्हवता. त्याला छत्रपती सारख्या महत्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसुबाई आणि
मंत्रीमंडळाने राजारामला बसवायचा निर्णय घेतला व लगेच १२ फेब रोजी राजाराम छत्रपती
झाले. राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांचापुढील परिस्थीती खराब होती. महाराज
संभाजी अटकेत होते, मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकले जाऊ
लागले. चारीकडुन स्वराज्यावर होनारा हल्ला, स्थानीक लोकांची
फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागनारा पैश्याची चनचन,
हे सर्व प्रश्न होते. स्वराज्य तर राखायचे, मराठे
शाहीला जिंवत तर ठेवायचे पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी
भिषन परिस्तिथी. औरंगजेबाचे सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते
राजारामाच्या मागेच लागले, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी
राजारामाला दुर जिंजीस जाउन राज्य राखण्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना
प्रतिनिधी पद ( जे अष्टप्रधानांच्या वरचे होते) देऊ केले. ह्या पदामुळे राजाराम
महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरिल सर्व
परिस्तिथी पाहाता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अमलांत आणला. मोगलांचा वेढा
स्वराज्या भोवती घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडुन किल्लेदारांना व
मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या
बाजुस वळविण्यास बोलणी लावली. बरेच सरदार
मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होता होईतो मराठा
लोकांना एकत्र आणण्यास सुरु केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारुन ठेवली होती.
संभाजीराजाच्या कालावधी नंतर शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे
मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने द्यायला सुरु केले. फोडा आणि वतने
देऊन मराठी लोकांना निष्क्रीय (स्वराज्याचा बाबतीत) करायला सुरु केले होते आणि
वतनदारीची पध्दत जी शिवाजी महाराजांनी मोडाली होती ती परत वर आली. याचा आपल्या
छोट्या मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भिषण दुष्काळ पडला. लालुच,
दुष्काळ आणि वतनाचा लोभ हे तिन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक
देशमुख, पाटील, सरदार मोगलांना मिळाले.
छत्रपती संभाजीच्या वधानंतर स्वराज्याचा सर्व भाग अगदी काहीच दिवसात मोगली
अमंलाखाली आला होता. स्वराज्य राहुन राहुन सातारा-परळी, विशाळगड, रत्नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन्-पाच
किल्ले ऐवढे मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते.
मोगलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला. राजाराम महराजांवर संकटावर संकट येत होती.
रामचंद्रपंत जे संभाजीच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना
"हुकुमतपन्हा" हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य
करण्याचे ठरविले गेले. अंधाऱ्या रात्री महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातुन निसटले व
जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ
दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाला लक्षात आले. तुंगभद्रा नदीतिरी भीषण संग्राम
झाला. महाराज स्वतः लढत लढत नदीत उडी मारुन पळुन गेले. बेदनुरला राणि चन्नामा
राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची
सुखरुप रवानगी जिंजीला केली. जिंजीला महाराजांचे जावई हरजीराजे महाडीक होते पण ते
त्याच काळात वारले होते, अशातच राजाराम महाराज तिथे
पोचल्यामूळे गोंधळ उडाला, घरच्याच लोकांस मात देऊन राजांनी
जिंजी हस्तगत केली. अंबिकाबाई व त्यांचा पुत्र गिर्जोजी यास कैद केले.
राजाराम
महाराजांचे कार्य हे दुर्लक्षिले गेले. जिंजी सारख्या ८-९०० मैल दुर असलेल्या
प्रदेशातुन महाराजांनी ओरंगजेबाविरुध्द दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविन्यासाठी
त्यांनी वतनदारी द्यायला सुरु केली. वतनदारीच्या आमिषा मूळे परत जुने लोक
स्वराज्याला सामिल होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ व
मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच
नेमला जो गावागावत फिरुन गुन्हेगारास शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी
हुंड्याचा रुपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि इथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल
संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फौजफाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज
पडली तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांचा वतनापुरते
राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे ईमान हे मुख्य राजा सोबत नसुन वतनदारासोबत
असे त्यामूळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली व वतनदारीस सुरुवात्
झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाउन
मिळत. एकच वतन अनेक लोकांना यामुळे दिले गेल व भलत्याच भानगंडींना स्वराज्याचा
न्यायाधिशाला नंतर सामोरे जावे लागले.
अशातच
एका मर्द मराठ्याने औरंगजेबाच्या तुळापुर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व
प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबुचे सोन्याचे कळस कापुन आणले. "हिमंते मर्दा तो
मदते खुदा" या वेळेस ओरंगजेबाचा खुदा मराठ्यांकडुन होता. लगेच् पंधरा दिवसात
घोरपडे बंधुनीं झुल्फीकारखानावर हल्ला चढवुन त्याचे पाच हत्ती पळवुन आणले. मराठी
सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर
आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना उगवत्या सुर्याची किरने लांबवर दिसायला
सुरुवात झाली होती.
धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चिज
बाळगुन होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरु करुन थोरल्या महाराजांप्रमाणे
अकस्मात हल्ले करायला सुरु केले. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधु (बर्हीर्जी व मालोजी) ह्या
सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवस रात्र पायपिट करुन ही लोक हल्ले करुन
अकस्मात माघार घ्यायची. "स्वराज्य" ही कल्पना टिकवुन ठेवण्यासाठी ह्या लोकांनी
अहोरात्र मेहनत घेतली. पुढे जिंजीवरच झुल्फीकारखानाने हल्ला केला. त्याला सोबत
होती फ्रेंच सैन्याची. महाराज परत अडचणीत आले. पण
तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा
सेनापती झुल्फिखारखान
यांच्या तावडीत सापडले. पण झुल्फिखारखानने
लाच घेऊन सर्वांची मुक्तता केली. यावेळी छत्रपतीं
व त्यांच्या कुटुंब कबिल्यास
सोडविण्यासाठी गणोजी शिर्के व राणोजी शिर्के मंडळीनी छत्रपती राजाराम महाराजांच्या
कडून दाभोळच वतन नावावर करून घेतलं. हे वतन शिवरायांच्यापासून येथील चौथाईचे हक्क चिटणीसांकडे होते पण खंडो
बल्लाळनी स्वामी निष्ठेपायी विचार केला नाही.जिंजी किल्ला
मोठा कठीण. लढवायला मजबुत. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि
दिवसरात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी मोगलांचा
( शाहजादा कामबक्ष व झुल्फीकारखान) धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजुबाजुच्या
परिसर जिंकुन घेतला. ह्यानंतर लगेच संताजी व राजारामचे काही कारणावरून बिनसले. संताजी
वापस महाराष्ट्रात निघुन आला. पण ईमान बघा या माणसाच, तो मोगलांना वा इतरांना न मिळता स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होता.
हे ईमान पैदा केल शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. संताजीला एक वैषम्य होते ते
म्हणजे महराज जे नविन लोक येतात (मोगलांकडुन फुटून) त्यांना जास्त विचारतात व जे जुने
आहेत त्यांची काळजी घेत नाहीत. महाराजांनी पत्र पाठवुन निर्धोक राहा असे सांगतीले
पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नविन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही त्यामुळे
संताजीस त्याची फौज खाली करण्याचा हुकुम पण महाराजांनी दिला व सरसेनापतीपद धनाजीला
दिले पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहीला पण
स्वराज्याच्या बाजुनेच. स्वराज्यासाठी नामुष्कीची गोष्ट अशी की संताजी व धनाजी यात
पण एक लढाई झाली. म्हणजे बघा आपण आपापसात पण लढतोय शिवाय मोगलांशीही लढतोय.
ओरंगजेबाकडे जवळ जवळ ३ लाखाची खडी फौज व अनेक
मराठे सरदार होते यावरुन तुम्हाला राजाराम महाराजांचा लढा किती विचीत्र होता हे कळेल.
ह्या लढ्याची तुलना जगातील इतर इतिहासाशी होऊ शकत नाही. मिर्झाराजा जयसिंगच्या
स्वारी पेक्षाही हा काल जास्त महत्वाचा होता असे वाटते कारण मिर्झा राजाच्या वेळेस
महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती पण गेल्या
दशकात ती पुर्णपणे उखडली गेली. मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३०
ते ५०००० पण भरत न्हवते. ऐकास साडेतिन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती,
तोफखाना हे सर्व तर आपले सैन्य हे तलवार, बर्च्या
व ढाली एवढेच घेऊन लढत होते. १६७९ ते १७०० पर्यंत महाराष्टावर सतत स्वाऱ्या होत
होत्या, दुष्काळ, जाळपोळ यामुळे
महाराष्ट्र खचुन गेला. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा,
पुरेशी फौज नाही अशाकाळात
वतनदारीशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर न्हवता असे वाटते. पण नंतर याचे
भंयकर दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले.
सततची धावपळ, सोबत वाईट
प्रकृती व (बहुतेक अफुचे व्यसन, त्याचबरोबर जिंजी (चंदी) मध्ये इतर व्यसनेही जडली
होती. नाटकशाळा वगैरे यांची संगत लावण्यात प्रल्हाद निराजीचा हात होता. त्यामुळे
ऐन धामधुमीच्या काळात बराच कालावधी त्यांनी ऐषोरामात घालवला. यातून बाहेर
काढण्याचे काम महाराणी ताराराणीने केले. असे काही इतिहासकार लिहीतात) यामुळे
राजाराम महाराज लवकरच वारले. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत
झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. शिवाजी आणि संभाजी दुसरा .पैकी शिवाजी
हा ताराराणी पासून तर संभाजी दुसरा हा राजसबाई पासून झालेला. तर राजा कर्ण हा नाटकशाळेपासुन झालेला तिसरा पुत्र होता असा
उल्लेख रियासतकार करतात.
राजाराम
हा मूळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्तिथ
घालण्याचा प्रयत्न केला व त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तीगत रित्या तो
गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. आक्रस्ताळेपणा
त्याचा अंगी न्हवता. धाडसी मनोवृत्तीचे उदा वर आपण पाहीलेच पण त्याने एका पत्रात
दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहीला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत
करत होता, पैसे न्हवते, पुरेसे सैन्य
न्हवते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू हे त्याचा अनुयायांना पत्राद्वारे लिहीत
होता. काय म्हणावे ह्या धैर्याला. बेडर वृत्ती, धाडसीपणा की
आणखी काही. हे गुण त्याला त्याचा वडिलांकडुन आले. ऐवढेच नाहीतर वडिलांसारखी त्याने
सुरतेला तिसरेंदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे
त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला व ते झाले नाही.
राजाराम महाराज महाराष्टात परत १६९८ मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपल्या पवित्रा
बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर ज्या झाल्या त्या
आक्रमण करण्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असुनही टिकत
न्हवते कारण त्यांचा राजा हाल सोसुन त्यांना लढण्यास भरीस पाडत होता. स्वतः स्वाऱ्यावर जात होता.
औरंगजेबाने त्याचा युध्दनितीत १६९८ ला परत बदल करुन मोठी चढाई केली त्याला घाबरुन
जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्यास राजाराम
महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतः अनेक स्वाऱ्या चालु केल्या गदग, वर्हाड येथे जाउन संपती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा
उल्लेख आहे पण त्या स्वारी बद्दल जास्त माहीती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर
सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्विकारले तसे राजारामाने शाहुचे
(संभाजीचे) राज्य स्विकारले. त्यांना छत्रपतीपदाचा मोह न्हवता.
कित्येक कागदपत्रात हे दिसुन येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी
फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहीतो. असा थोर राजा महाराष्ट्राला
लाभला हे आपले भाग्य. त्यांनी त्यांच्या काळात स्वराज्य वाचवल आणि विस्तार ही
केला.
अशा
सततच्या स्वाऱ्या , लढाया , धावपळीतच त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली नाही.
मुळातच कमकुवत तब्येतीचे. त्यामुळे धावपळ
सहन झाली नाही आणि तब्येतीने साथ सोडली
आणि अवघ्या वयाच्या ३० व्या वर्षी
सिंहगडाच्या कुशीत त्यांनी ३ मार्च
१७०० मध्ये देह ठेवला.
No comments:
Post a Comment