शंभू चरित्र भाग १३

                                                           शंभू चरित्र  भाग १३



                                     संभाजी राजांजवळ मैत्रीचं फर्मान घेऊन आलेल्या अकबरला संभाजींनी हाताशी धरलं आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चाली खेळायला सुरवात केली. पण! लागोपाठ तीन तडाखे बसलेला औरंगजेब चवताळून उठला. आग्यामोहळं उठावं असा औरंगजेब पिसाळला आणि उचलली पाऊलं त्यांनी "खासे दख्खन" वरं औरंगजेबाचे "साम्राज्यं" म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं "साम्राज्यं". आणि संभाजींच "स्वराज्य" म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोटं "साम्राज्यं". मनंभर सैन्यं कणभर मराठ्यांना चिरडायला निघालं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार होती, कईक नातंलग, शहजादे, अफाट-अफाट सेनापती, चार लाखांचं सैन्यं, चौदा कोटींचा खजिना, चाळीस हजार घोडी, सत्तर हजार घोडी, पस्तीस हजार उंट. अरे! औरंगजेबाची छावणी पडली तरं तीन मैलांचा परिसर व्यापून जायचा. एवढं अफाट सैन्यं आलं चालून महाराष्ट्रावरं आणि सह्याद्रीच्या कड्यांवरनं कडाडला छावा!..."येऊद्या त्या औरंगजेबाला, अखेरं! त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तरं...!!!" आता बघेल या छाव्याचा "गनिमी कावा". आणि बघता बघता संभाजी सज्ज झाला. वय वर्ष अवघं तेवीस. महाराष्ट्राचं आभाळ काळवंडून गेलं. औरंगजेबानं एकापाठोपाठ मोहिमी लगडल्या.
सरबुलंद खान, आलेखान, फ़तेह्खान, शहजादा अज्जम, बेदारबख्त मुअज्जम, शहाबुद्दीन खान, बहादूर खान, एक-एक नामचीन सेनापती अफाट ताकदीने महाराष्ट्राला कैचीत पकडायला चाहोबाजूंनी आत घुसवले आणि मराठे सज्ज झाले. संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोघलांची लंगडेतोड चालू केली. मराठे सुसाट सुटले. जिथं भेटेल तिथं मोघलांना कपात राहिले. अरे! सरबुलंदखान मारं खाऊन परतला, फ़तेह्खान तोंड काळं करून गेला, तो बहादूर खान नुसता पळून पळून दमला, शहाबुद्दीन खानला तरं काही सुचेना. औरंगजेब चहोबाजूंनी नुसत्या शिखस्तीच्या बातम्या ऐकत राहिला. हार-पराभव, हार-पराभव. अरे! तेवीस वर्षाचा 'छावा' संभाजी मोघलांना पार सळो कि पळो करून सोडलं. तू महाराष्ट्रात येतो ना! संभाजी राजांनी विलक्षण युद्धनीती खेळली, मराठ्यांच्या फौजा सरळ मोघलांच्या प्रांतात घुसवल्या. इतकं इतकं फाडलं कि औरंगजेबाला काही कळेना, मराठे तिथं आले म्हणून सैन्यं पाठवावं तरं मराठे पुढं, मराठे तिथं गेले म्हणून सैन्यं पाठवावं मराठे त्याच्या पुढं, अरे! कुठं कुठं शिवावं? सगळीकडंच फाटत निघालंय. इथं शिवावं तरं तिथं मराठे फाडतायत, तिथं शिवावं तरं मराठे तिकडं फाडत निघालेत. कुठं कुठं? ठीगळं लावावी. वैतागून, संतापून गेला औरंगजेब. आपल्या सरदारांवर बरसत राहिला..."क्या करतें हो बंदोबस्त? खिल्लतें पेहेनके ख़ाली मारं खातें हो! इतनी फ़ौज दी दिमत ने कहाँ गयी ? कहाँ गया वों दख्खन का चुहाँ ?
तसा कुणी सरदार म्हणाला, "हुजुर वों संभा सैतान है!......अरे! फ़िर हम कहां सैतान से कम है!...फ़िर भी क्यों शिखस्त? फ़िर भी क्यों हार?" औरंगजेबानं मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्धची मोहीम उघडली पण! संभाजी राजांनी त्याची पुरती वाट-वाट-वाट लावली. कडाडला संभाजी राजा,""आमच्याच वाटेवर येऊन...आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची...त्याच्या वाटेवर जाऊन...वाट लावल्याशिवाय...आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही""..."तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे तुला भाजायला वेळं नाही लागणारं!!!" आणि बघता बघता मराठे भाजत-भाजत सुटले. त्या धगीनं औरंगजेब हैराण झाला.

No comments: