शंभू चरित्र भाग २४

                                                    शंभू चरित्र भाग २४
                          
                    संभाजी राजांना शिखस्त
करण्यासाठी काय करावं? याच
संतापानं औरंगजेब विचारं करू लागला.
आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला,
"हुजूरं! मराठों की जान है, उनके
गड्किलोंमें...पहलें गड्किलें ले लेतें है!
मराठें खुदबखुद आयेंगे घुटने टेंकते
हमारें सामने!......बहुत खूब!!! ये बात
सच है!
आणि त्यानी विचारलं..."ऐसा कौनसा क़िला है?
जो जल्द से जल्द
लिया जा सकतां है!"
तरसला होता विजयासाठी औरंगजेब,
तरसला होता. आणि मग! एकानं
सांगीतलं, "हुजूरं! एक क़िला है!
नाशिक जिल्ह्यातला". "दिंडोरी"
पासून अवघ्या दहा मैलावरं
असणारा "प्रभु श्री राम" तिथं
विश्रांतीसाठी जायचे. त्यांची सेज
तिथं आहे. म्हणून त्या किल्ल्याचं
नावं पडलं "रामसेज"..."हुजूरं!
छोटासा क़िला आहे.
आणि मराठे?...अवघे सहाशे हुजूरं! ,
तोफखाना?...कुछ नहीं हुजूरं! ,
बज्मीयत?...कुछ नहीं हुजूरं!..."कौन
जाएगा?"
आणि उभा राहिला शाहबुद्दीन खान,
"हुजूरं हम जायेंगे!!!"...कितने दिनों में
ले लोगें क़िला? कितने दिनं?..."हुजूरं
एक दिनं काफ़ी है! आज गया क़ल
क़िला लेकें आया!". औरंगजेब खुश
झाला, "बहुत
खूब!!!"...दहा हजाराची फौज दिली.
"ज़ाव ज़ाव हमें 'रामसेज' चाहिए!"
आणि विजयाची खबर
ऐकायला औरंगजेब आतुरला,
निघाला शाहबुद्दीन खान.
वेढा टाकला "रामसेज"ला. अरे!
अफाट सेनासागर मराठ्यांचे अवघे
सहाशे मावळे वरनं बघतायत. प्रचंड
सैन्यं, तोफा, बारूद,
बज्मीयत...अफाट!!!
आणि बघता बघता शाहबुद्दीननं
वेढा लावला, मोर्चे लावले
आणि आदेश दिला. "यल्गारं...!!!" अनं
निघाली मोघली फौज "रामसेज"वरं
वेस ओलांडून पुढं-पुढं पारं
निम्म्यापर्यंत पोहोचली.
आमच्या मराठ्यांची हालचालं
ना प्रतिकारं. शाहबुद्दीन
खानाला वाटलं, बहुतेक न लढताच
किल्ला देतायत वाटतं. मोठा उत्साह
आला..."चलो आगे!...चलो आगे! ले
लो क़िला. सैन्यं पुढं-पुढं-पुढं, सैन्यं
निम्म्याच्या पुढं आलं तसे आमचे
मराठे सावध झाले.
किल्लेदारांची इशारत घुमली, मराठे
उभे राहिले.
हातातल्या गोफण्या थरारल्या, दगडं
भरली...सुटली दगडं. "दणा-दणा-
दणा-दणा,,थाड-थाड-थाड!!!" दगडं
आदळू लागली. पत्थरांची बौछारं
नुसती. त्या दगडांच्या मारांनी घायाळ
झालं शहाबुद्दीनचं सैन्यं.
पाठीला पाय लाऊन पळत सुटलं.
त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगडं
बसलेला ती जखम दाबीत शाहबुद्दिन
म्हणाला..." कैसे है ये मराठें,
पत्थरोंसे खेलतें है! " एका दिवसात
किल्ला घेतो म्हणालेला तो शाहबुद्दीन
खान रात्री खलबत खाण्यात
जखमा शेकत बसला होता.
"क्या किया जाय अब?" त्यात एक
सरदार होता मोठा त्याने
युक्ति काढली, "हुजूरं ऐसा करतें
हैं...बोलो!...नहीं काल आपण चालत
चालत गेलो दगडं डोक्यावरं बसली,
उद्या चालत चालत
नको जायला...मग!...सर्र्पटत,
सर्र्पटत जाऊ म्हणजे दगडं
आली तरी वरनं जातील
आपल्याला लागणारं नाही.
मोठी नामी कल्पना,
फतेखानला पटलं..."ऐसा हि करेंगे!".
दुसऱ्या दिवशी चढाई सुरु झाली.
उरलं-सुरलं सैन्यं निघालं, निघालं-
निघालं सरपंटत, सर्र-सर्र-सर्र
करत पुढं, पुढं-पुढं-पुढं वेस ओलांडून
पुढं पार निम्म्यापर्यंत. कुणी डोकं
वरं करायला तयार नाही, चुकून डोकं
वरं करायचो, डोक्यात दगड
बसायचा, डोक्याला ताप नको बघ
खाली आणि चाल पुढं, सर्र-सर्र
करत निघालाय सैन्यं. आता जवळ-
जवळ किल्ल्यावरं पोहोचणारचं.
शहाबुद्दीन आनंदला "ले
लिया किला...चलो आगे!" आणि हे
सर्र्पटनारं सैन्यं टप्प्यात आलं तसे
मराठे सावध झाले. रात्रंभर जागून
तटबंदीवर मोठ-
मोठ्या दगडी शीळा गोळा करून
ठेवलेल्या. हे सैन्यं जवळ आलं
तशा दगडी शीळा दिल्या नुसत्या ढकलून,
गडगडा करत शीळा सुटल्या खाली.
सर्र्पटणाऱ्या प्राण्यांना कायमचं
सर्र्पटणारं करून मग! तळा जाऊन
थांबल्या.

No comments: