शंभू चरित्रं भाग ०४

                                                              शंभू चरित्रं भाग ०४
               
                            औरंगजेबाला भर दरबारात मराठी मातीचा दणका दाखवल्यानंतर त्या दिवसापासून "शिवराय" औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नव्हते.पण! शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून "संभाजीराजे" मात्रं औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानी संभाजी राजांना विचारलं, "राजे!!! आपण उत्तमं मल्लविद्या जाणता असं आम्ही ऐकून आहे. आपण उत्तमं कुस्ती खेळता असही आम्ही ऐकलयं. मगं! संभाजी राजे!!! आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या माल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा नऊ वर्षाचा छावा कडाडला...." आम्ही फक्तं आमच्या लायकीच्या माल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही...सबब!!!"
हे महाराष्ट्राचं पाणी होतं. महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाजी राजांनी वयाच्या नवव्या वर्षीच औरंगजेबाला दाखवला. पण! बघता बघता औरंगजेबाची मुठी आवळत गेली, शिवरायांचा गळा गुदमरू लागला आणि त्याचवेळी शिवरायांना बाहेर पडायला मुभा नाही. पण! संभाजीराजे मात्रं औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिंदोख येत जात होते. या सगळ्या सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी संभाजी राजांवर सोपविल्या आणि महालापासून कुंभाराच्या वाड्यापर्यंत सगळी चाल संभाजी राजांनी व्यवस्थित पेरली. आणि बघता बघता दिवस उजाडला जे स्वप्नांतही शक्यं होणारं नाही ते शिवरायांनी सत्यात उतरवलं आणि "महाराष्ट्राचा नरंसिंह" सुटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला.
पण! आपला एकुलता एक पोरं "संभाजी" त्याला मागं ठेवून त्यावेळी एका पित्याचं काळीज गलबलंल नसेल का? जीव व्याकुळला नसेल का? अरे! नऊ वर्ष उमरीच पोरं कसं ठेवावं मागं, मृत्युच्या दारात, औरंगजेबाच्या दरबारात अरे!!! कसं ठेवावं. जरं जातेवेळी त्या संभाजी राजानं विचारलं असतं शिवरायांना, "आबासाहेब..आम्हाला सोडून एकटेचं जाणार?" अरे! तरी हा सुद्धा हटला असता मागं, धरणी कंपच झाला असता, फाटला असता बांध जरं विचारलं असतं संभाजीनी "आबासाहेब आम्हाला सोडून एकटेचं जाणार!!!". पण त्यावेळी हा "सर्जा संभाजी राजे" आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होते, "आबासाहेब..आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे" आणि आपल्या पोराच्या परिपक्वतेवरं हा "नरंसिंह" खुश झाला. यताकाल राजे निसटले आणि राजगडावर पोहोचले आणि पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी वार्ता उठवली "वाटेत संभाजी राजांचं निधनं झालं". वयाच्या नवव्या वर्षी संभाजी राजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावरं मरणा निधड्या छातीनं सामोरं जायीपर्यंत ते मरण तशीच त्यांची सोबत करत राहिलं. पण! शिवरायांनी उठवली होती हुलं. राजगडावर तर संभाजींचे अंत्यविधी सुद्धा झाले. येसूबाई सती जायला निघाल्या. जिजाऊ तरं रडून रडून थकल्या पण! सगळी चाल शिवाजींनी आपल्या काळजात मिटून ठेवली तोपर्यंत जोपर्यंत संभाजी राजे सुखरूप गडावर येत नाहीत. हुलं उठवली एवढ्यासाठी कि संभाजींच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळेल आणि औरंगजेब त्यांचा पाठलाग सोडेल आणि मग सुरक्षित संभाजी राजे गडावर येतील आणि झालं तसचं संभाजी राजे सुरक्षित गडावर पोहोचले पण गेलेले शंभूराजे वेगळे होते आणि परत आलेले संभाजी राजे वेगळे होते. परत आले होते "धाकंला धनी","जाणता","परीपक्वं झालेला","मोघली रियासतीचा","राजकारणाचा" अभ्यास करून तयार झालेले......"संभाजी राजे"

No comments: