शंभूचरित्र भाग:- ०१
(सूचना:- "धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज" यांचे चारित्र्य "संभाजी राजांचा" खरा इतिहास सर्वाना कळावा यासाठीचा माझा प्रयत्न आहे.आजपासून "श्री शंभू चारित्र्य" च्या माध्यमातून सर्वासमोर येईल तरी सर्वांनी वाचावे हि विनंती. खूप मोठं आहे वेळ नाही वाचायला असे बोलून कोणीही टाळाटाळ करू नका. अरे! आपले "शंभू राजे" आभाळापेक्षा मोठे होते आणि त्यांचा पराक्रम जाणून घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे कृपया शेअर करा..अरे! कळूद्या संपूर्ण जगाला आपले "संभाजी राजे" कसे होते ते. शेअर करा!!! .)
"इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवूच शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरूच शकत नाही" हाही एक इतिहास आहे."तेजस्वी" आणि "ओजस्वी" इतिहास याच मातीत घडला, "शिवशंभू" चरित्राचं कर्तृत्वं ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं एकवटतो एवढी एकचं गोष्ट तुमच्या आमच्या काळजामध्ये "राजा शिवशंभू" अजूनही जिवंत आहेत. याचीच ती साक्षं.
"इथल्या मातीचा एखादा ढेकूळं कधी हातात घेतला तो पाण्यात टाकला,तरं पाण्यावरं जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल". आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही,"या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलयं तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला!"
या सह्याद्रीची सैरं करणं कोणा ऐऱ्याचं गैऱ्याचं काम नाही, सह्याद्रीची सैरं फक्तं तीघचं करू शकतात. पहिला"वाघ",दुसरा"वारा" आणि तिसरे"मराठे"!!! या तिघांशिवाय सह्याद्री पेलनं कुणाला जमलं नाही साधलं नाही. या सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा कचरीलाचा जन्मं कधी झालाचं नाही. इथं जन्माला आले ते "शिवराय" आणि "शंभूराय". ३५० वर्षापूर्वीचा जागरं आजही घडतोय इथं. "छत्रपती शिवाजी महाराजांचं" नाव कानांवर पडतं आणि आमच्या शरीरावरं रोमांच उठतात, "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी किल्कारी कुठं निनादते आणि आमचं शरीरं पेटून उठतं. मनमनांमध्ये उर्मिजाप, निर्णाजाय, प्रेरणास्त्रोत तयार होतो. अरे! ३५० वर्ष झाली या राजाला आम्ही विसरू शकतं नाही. अरे! दूरवरं कुठेतरी किल्कारी ऐकू येते "छत्रपती शिवाजी महाराज कि" आणि आमच्या ओठातून कधी "जय" बाहेर पडतं आमचं आम्हाला कळतं नाही. जणू काय आमच्या धमन्यांतून सळसळनाऱ्या रक्ताच्या थेंबा-थेंबामध्ये तो "राजे शिवाजी" अजूनही जिवंत आहेत. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्तेक पोराच्या भाळावरं इथली माती जन्मतःचं "शिवाजी" हे नाव कोरूनचं त्याला जन्माला घेते कि काय असं सांगावं इतकी जादू या राजाची आहे. असं काय केलं असेल या राजानं!!! असं काय निर्माण करून ठेवलं असेल!!!
३५० वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीरं पेटतं असेलं, ३५० वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला स्फूरणं चढतं असेलं तर ३५० वर्षापूर्वी खुद्द "शिवछत्रपतींच्या" कुशीत जन्माला आलेले "संभाजी राजे" कसे असेलं !!!
अरे! कसा घडला असेलं!...कसा उभा राहिला असेलं!...कसं असेलं शौर्य!...कसं असेलं धैर्य!...कसं असेलं धाडसं!...कसं असेलं साहसं!...कसा असेलं अभिमान!...कसा असेलं स्वाभिमान!...कसा असेलं पराक्रम!
कसं असेलं नेतृत्वं, व्यक्तीत्वं, कर्तृत्वं!!!
कसे असेलं......""संभाजी राजे""
No comments:
Post a Comment