शंभू चरित्रं भाग २२

                                                      शंभू चरित्रं  भाग २२


                                                     बघता बघता सेतू तयारं व्हायला लागला पण! समुद्राच्या लाटां सेतू बंधू देईनात,लाकडाचे ओंडके किनाऱ्यावरं टाकू लागल्या,कापसाच्या गाठी बाहेरं फेकू लागल्या. पण! थांबतायत ते "संभाजी राजे" कसले. मोठ्या चिवटपणे काम चालू ठेवलं.
( कधी जंजीऱ्यावरं गेलात न तरं "संभाजी राजांनी" समुद्रात बांधलेला तो पुलं अजूनही दिसतो...दिसतो अजूनही )
दर्या बंधू देईना, पण! संभाजी हटायला तयारं न्हवते. सिद्धी खैरतखान, सिद्धी कासमखान पुरते उलथे..पालथे झालेले. आता! संभाजी सोडत नाही आणि आता जंजिरा जवळजवळ हातात आलाचं, मराठ्यांच्या तोफा आग ओकत होत्याच, "लांडा कासम", "कलाल बाघडी" या सिद्धीच्या तोफांनी कधीचं माना टाकलेल्या. मराठ्यांच्या तोफांची धग त्यांना सोसली नाही. आता जंजिरा हातात येणारचं पण! त्याचवेळी औरंगजेबानी जहरी चाल खेळली, "कल्याणला" हसन अली खान पाठवला आणि वार्ता संभाजी राजांना मिळाली..."कल्याणला हसन अली खान चालून आलाय" आणि संभाजींच्या काळजाचा ठोका चुकला. "कल्याण" म्हणजे "स्वराज्यं". जंजिरा घ्यायच्या नादात "स्वराज्यं" औरंगजेबाच्या घशात जायला नको. संभाजी राजांनी सरळं वेढा दादाजी पंत, वेसाजी पंतांवर सोपवला आणि संभाजी राजे कल्याणकडं चालते झाले. बघता बघता कल्याणला पोहोचले, हसन खानला तुडवं..तुडवं तुडवला आणि कल्याणवरं पुन्हा "भगवा" फडकला. पण! "जंजिरा" त्यापासून हातातनं गेला तो गेलाच, या घटनेमुळं "जंजीरा" काही हातात आलाच नाही.
पण! सिद्धीवरं अशी जरब बसवली संभाजी राजांनी की, संभाजींच नाव ऐकलं तरी जंजीऱ्याच्या काठंच दर्याचं पाणी चळाचळा कापायचं. इतकी अफाट!...अफाट! जरब बसवली "सर्जा संभाजी राजांनी"

No comments: