शंभू चरित्र भाग ०५

                                                 शंभू चरित्र  भाग ०५

    
                                            "संभाजी राजांचं" वयं झालं दहा वर्ष. त्याचवेळी शिवाजीराजांनी संभाजी राजांना विचारलं, "संभाजी राजे आपण लेखणी तेज चालवता पण! आपली तलवारं?" अरे! उसळला छावा......"आज्ञा द्यावी आबासाहेब!!!" आणि आज्ञा दिली गुजरात खंबायप्रांत टिपण्याची आणि दहा हजाराची फौज घेऊनं बछड निघालं. दावेचा लोट काळ्या कबिनं धाकानं उरातं घ्यावा तसा शौर्याचा लोट घेऊन निघाला. कोसळला गुजरातवरं खंबाय टिपलं, बागानगर लुटलं, मामे जाधवरावं खासे कैद केले आणि स्वतःच्या शौर्याची मोहरं स्वराज्यावरं उमटवली आणि त्यांच्या युद्धनीतीनं अनेकांच्या नजरा विस्पारून गेल्या. शिवरायांना बातमी कळाली आणि कडाडले शिवराय..."द्या बत्ती तोफांना, आमचा बछडा जीत घेऊन रायगड जवळं करतोय!" आणि स्वराज्यावरं संभाजींचा पहिला पराक्रमं उमटला.
लेखणीच्या, बुद्धीच्याचं बळावरं न्हवे तरं मनगटांच्या परीक्षेत सुद्धा संभाजी राजे अव्वलं आले. यताकाल जिजाऊ माँसाहेबांनी मुलखी प्रशासनाच्या सगळ्या जबाबदाऱ्या संभाजी राजांवर सोपवल्या. दानंप्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या वरच्या ज्या तक्रारी यायच्या त्याचं निराकनं करण्याची जबाबदारी सुद्धा संभाजी राजांवर सोपविली. एवढचं न्हवे धर्माच्या बाबतीत जे जे खटले शिवरायांच्या न्यायालयापुढे यायचे ते सगळे खटले शिवराय आता "धर्मपंडित" असणाऱ्या संभाजी राजांच्या न्यायासनापुढं चालवायला देऊ लागले आणि संभाजी राजांच्या धर्माचे खटले बघता बघता त्यांचे न्याय लोकांमध्ये प्रियं होऊ लागले. "न्यायकठोरं संभाजी" म्हणून संभाजींची लोकप्रियताही वाढली. जनतेच्या कल्याणाचं सूत्रं संभाजी राजांनी आपल्या काळजात जपलं कारणं! शिवरायांनी दिला होता महामंत्र,""रयतेच्या डोळ्यातला एक अश्रूही राजाला एका बलवान शत्रूपेक्षा भारी वाटतो...एकवेळ शत्रूनं पराभव केला तरी चालेल पण! रयतेच्या डोळ्यातल्या अश्रूंनी राजाचा पराभव होता कामा नये""
आणि संभाजीराजे त्याचं शिवरायांच्या पाऊलावर पाऊल टाकून रयत जपत होते. अगदी मार्दवतेनं, पोटच्या लेकासारखे.

No comments: